सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

सुप्रीम कोर्टात मराठी बाणा

वकिलीत कार्यरत असलेल्या कुणालाही दिल्लीत जाऊन सुप्रीम कोर्ट पाहण्याची नेहमीच आस असते. मराठवाड्यातील वसमत तालुक्यात घडलेले अॅड. शिवाजी जाधव यांनी सुप्रीम कोर्टाच्या पायरीवर मराठी वकिली बाण्याचा दमदार आवाज पोहोचविला. सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडले गेलेले ते पहिलेच मराठी वकील...

मराठवाड्यातील वसमत तालुक्यातील शिवाजी जाधव यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर परदेशात उच्च शिक्षण घेतले. दिल्लीत सुप्रीम कोर्टात वकिली सुरू केली. वकिलीत चांगला जम बसला. ३० ज्युनिअर्सची टीम सोबत घेऊन काम करणारे जाधव यांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे पद मिळविणारे ते पहिले मराठी वकील आहेत. वसमतपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी जाधव वसमत तालुक्यातील किन्होळा गावाचे रहिवासी. त्यांचे वडील मुंजाजीराव जाधव हे गावातील पहिले पदवीधर. त्यांनी वकील होण्याचा निर्णय घेतला. कुटुंबासाठी शिक्षक, विकास अधिकारी या पदांवर नोकरी करीत त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. एलएलबी झाल्यावर नोकरी सोडून वकिली सुरू केली. पुढे ते १९८४ ते १९८९ या कालावधीत आमदारही होते. शिवाजी जाधव यांनी १९८५मध्ये एलएलबी पदवी पुणे विद्यापीठातून पहिल्या क्रमांकाने मिळवली. त्यानंतर मुंबई विद्यापीठात एलएलएम पूर्ण केले. मुंबईत ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. एम. तारकुंडे यांचे सहकारी चित्तरंजन दळवी यांनी त्यांना प्रेरणा दिली. पुढे अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठात त्यांनी कायद्यातील उच्च शिक्षण घेतले. शिक्षणानंतर तेथे एक वर्ष नोकरी केली, पण वडिलांच्या आग्रहामुळे ते भारतात परतले. अमेरिकेतून परतल्यावर औरंगाबादेत हायकोर्टात वकिली सुरू केली. मित्रांबरोबर चर्चेतून सुप्रीम कोर्टात वकिली करण्याचा निर्णय झाला आणि अॅड. जाधव जून १९८९मध्ये दिल्लीत दाखल झाले.सुप्रीम कोर्टात त्यांनी प्रॅक्टिसमध्ये जम बसविला. नॉएडा येथे मोठे कार्यालय सुरू केले. आता ३० ज्युनिअर वकील त्यांच्यासोबत काम करतात. गेल्या पाच-सहा वर्षांपासून सर्वाधिक प्रकरणे हाताळणारे वकील अशी त्यांची ओळख झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक महापालिका, जिल्हे, तालुके, साखर कारखाने, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, राजकीय नेते, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनी शिंगणापूर, शेगाव संस्थाने आदींची प्रकरणे त्यांनी सुप्रीम कोर्टात हाताळली आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या खटल्यातही त्यांचा सहभाग आहे. पुणे जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या वारसांना ३५ हजार हेक्टर अतिरिक्त जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. हा खटलाही जाधव यांनीच चालविला. मालेगाव, सिन्नर तालुक्यांतील एमआयडीसीने संपादित केलेली गावे त्यांनी सोडवून आणली. शिक्षण सेवक, विक्रीकर निरीक्षक, वक्फ बोर्ड, विनय कोरे यांच्या साखर कारखान्याचे प्रकरण आदी प्रकरणे त्यांनी यशस्वीपणे हाताळली.सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड झाली. या पदावर काम करणारे ते पहिले मराठी. रोज नवी प्रकरणे, नवी आव्हाने पेलणारे जाधव करिअरबाबत अत्यंत सकारात्मक आहेत. 'आयुष्यात वेळेचे महत्त्व कळणे आवश्यक आहे. गेलेला क्षण परत येणार नाही. तो सत्कारणी कसा लागतो, यावर तुमचे भवितव्य अवलंबून असते. कुठलीही अपेक्षा न ठेवता सतत काम करीत राहिल्यास अपयश येणार नाही,' असे त्यांचे सरळ-सोपे तत्त्वज्ञान आहे.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

मोहिमेत मराठी तंत्रज्ञ


         पीएसएलव्ही सी - २५ या उपग्रह प्रक्षेपकाने मंगळाकडे यशस्वी झेप घेतली. या उपग्रहाच्या निर्मितीत प्रदीप देवकुळे मराठी अभियंत्यांने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. उपग्रहाच्या संदेशवहनासाठीची जबाबदारी सांभाळल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे प्रदीप देवकुळे यांनी मटा शी बोलताना सांगितले. 

        औरंगाबादेतील गर्व्हर्मेंट पॉलिटेक्निकमधून मॅकेनिकलची पदविका घेतलेले देवकुळे मूळचे भिंगार (जि. नगर) येथील आहेत. मॅकेनिकल इंजिनीअरिंग केल्यानंतर त्यांनी ग्राइंड मास्टरमध्ये तीन वर्षे नोकरी केली. २००८मध्ये ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) रुजू झाले. भारताने आज पहिली मंगळ मोहीम राबविली. टेलिमॅट्रिक ट्रॅकिंग कंपाउंड (टीटीसी) अँटेना, पॅराबोलिक रिफ्लेक्टर सिस्टम यासह त्यांनी कम्युनिकेशन सिस्टम ग्रुपमध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. 

        देवकु
ळे म्हणाले, इस्त्रोचे चेअरमन के. राधाकृष्णन यांचे हे स्वप्न होते. कारण आपण, चंद्रयान एक मोहीम यशस्वी केली. चंद्रयान - २ ची तयारी करण्यात आली आहे, पण मंगळ मोहिमेसाठी राधाकृष्णन यांनी स्वप्न पाहिले होते. अमेरिका, रशिया, युरोपीय देशांनंतर ही कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. ऑगस्ट २०१२मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली. वर्षभराहून कमी कालावधी उरलेला असताना आमच्या सर्वांवर मोठी जबाबदारी होती. माझ्याकडे उपग्रहाकडून आमच्याकडे येणारे संदेश, आमच्याकडून दिले जाणारे संदेश वहन करण्यासाठी लागणारे अँटेना, रिफ्लेक्टर याच्या निर्मितीत मी होतो. माझी पत्नी नंदिनी हिचे मला मोलाचे सहकार्य या मोहिमेदरम्यान लाभले. '' 

       कंम्प्युटरवर केलेले डिझाइन आणि थेरॉटिकल डिझाइन तपासून ते जुळविण्याचे अवघड काम देवकुळे यांच्याकडे होते. अँटेना आणि रिफ्लेक्टरसाठीचे अॅल्युमिनिअम प्रोटोटाइप त्यांनी बनविले. त्याची यशस्वी चाचणी मुंबईला गोदरेज कंपनीत करण्यात आली, असेही देवकुळे यांनी आवर्जून सांगितले. 
प्रदीप माझ्याकडे डिप्लोमाला होता. तो मुळातच अतिशय हुशार, सदैव नवीन कल्पना, नावीन्यतेत रुळणारा हा विद्यार्थी होता. एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याची त्याची वृत्ती होते. मंगळ मोहिमेत त्याचा सहभाग आहे, याचा मनस्वी आनंद झाला. 

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१३

फॅशनच्या दुनियेत मराठी मोहर

फॅशनच्या दुनिेयेत महत्वाचा मानला जाणा-या 'मिस दिवा-२०१३' पुरस्कावर यंदा मराठी मोहर उमटली आहे. मानसी मोघे हिने मिस दिवा-२०१३ पुरस्काराचा मानाचा मुकुट मिळवला आहे. झीनत अमान, रविना टंडन, माजी मिस युनिव्हर्स रॅनडा सहर बिनिआझ यांनी मिस दिवा-२०१३ मानसीला मुकुट प्रदान केला.
वेस्टीन मुंबई गार्डन सिटी, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या एका रंगारंग कार्यक्रमात मानसीला विजेती म्हणून घोषित करण्यात आले. तर गुरलीन ग्रेवल आणि सृष्टी राणा यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.या कार्यक्रमाच्यावेळी झीनत अमान, रवीना तंडन, मलाइका अरोरा खान, जॅकलिन फर्नांडिझ, रविना टंडन, कुणाल कपूर, अतुल कसबेकर आणि माजी मिस युनिव्हर्स रॅनडा सहर बिनिआझ या बड्या हस्तींनी हजेरी लावली होती.मिस दिवा-२०१३ स्पर्धेतील अन्य विभागांमध्ये मिळालेले पुरस्कार:
प्रिती चौहान (मिस परफेक्ट बॉडी) सोनिका चौहान (वेस्टीन मिस पॉप्युलर) निश्चिता राव (मिस रनवे) झातलेका मल्होत्रा (मिस फोटोजेनिक) यश्ना खुराना (आयटेक्स मिस ब्युटिफुल आय) सुश्री श्रेया मिश्रा (मिस डिजीटल) सीप तनेजा (मिस सोडोकू)

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

एका संघर्षाची अखेर

आपले हितसंबंध जपणारी व्यवस्था शाबूत राहावी यासाठी राजसत्ता अर्थसत्ता आणि धर्मसत्ता या तिन्ही सत्तांचा वापर करणारी माणसं नेमकी कशाला आणि कोणाला बाजूला सारू पाहतात याचं उत्तर शोधू गेलं तर या सत्ताचौकटींचंमुखवट्याआडचं अस्सल रूप ज्यांना दिसलं आणि ते इतरांच्या नजरेला आणून देण्याचा खटाटोप ज्यांनी आरंभला अशांना बाजूला सारलं. 

महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन लागलं की आश्वासनांच्याकागदपत्रांचे आणि कायद्याच्या सुधारित मसुद्याचे भारे घेऊन मंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत खेटे घालणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आता यापुढं विधानभवनाच्या आणि मंत्रालयाच्या वास्तूला दिसणार नाहीत. त्यांचे म्हणणे बुद्धीला तर पटते आहे मात्र राजकारणाच्या गाळात ते प्रत्यक्षात आणण्याची इच्छा नाही अशा धर्मसंकटातून जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची किंचित सुटका झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये इतकी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची आणि पर्यायानं डॉ. दाभोलकरांचीही परवड महाराष्ट्राने केली. मंगळवारी थंड डोक्यानं कट रचून केली गेलेली त्यांची क्रूर हत्या ही एकप्रकारे ​मनुष्यप्राण्याला माणूसपण देणाऱ्या विवेकाच्या आतल्या आवाजाचीच हत्या म्हणावी लागेल. 

डॉ. दाभोलकर यांना हा विवेकाचा आतला आवाज गेल्या चार दशकांपासूनच सतावत होता. स्वस्थ बसू देत नव्हता. दाभोलकरांच्या कुटुंबाचाच अविभाज्य भाग असलेल्या या विवेकाचा समाजवाद हा चेहरा होता आणिमार्गाची प्रेरणा म. गांधींची होती. १० भावंडांमधील सर्वात धाकटे असलेले नरेंद्र यांची प्रकृती थोरले बंधु शिक्षणतज्ज्ञ देवदत्त शेतीतज्ज्ञ बंधु श्रीपाद दुसरे बंधु दत्तप्रसाद आणि दत्तप्रसन्न यांच्यापेक्षा काहीशी बंडखोरीची आणि कठोर चिकित्सेची. साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून शालेय आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतल्यावर मिरजेच्या मेडिकल कॉलेजातून त्यांनी एम.बी.बी.एस. पूर्ण केलं. १२ वर्षं साताऱ्यातडॉक्टरकी केली. लौकिक अर्थानं पाह्यलं तर कोणाही मध्यमवर्गीयाला समाधान वाटेल असं आयुष्य आणि करिअर त्यांच्या हिश्श्याला आलं होतं. नुसती डॉक्टरकीच केली असती तरी लोकांनी नावाजलं असतंच... पैसाही मिळाला असता. 
१९७०चं दशक हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वादळ घेऊन आलं. दलित चळवळीची झंझावाती सुरुवात झाली होती. सत्यशोधक विचारधारा प्रमाण मानत समाजपरिवर्तनाचा आग्रह धरणारे नेते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेल्या एक गाव एक पाणवठा मोहिमेने महाराष्ट्रात खोलवर रुजलेल्या जातीयतेचं विद्रुप रूप समोर येत होतं. विकासाच्या गंगेचा थेंबही न पोहोचलेल्या खेड्यापाड्यातील वंचित भूमिहिनांची गाऱ्हाणी मुखर करणारीआंदोलनं रुजू पाहत होती. अशा स्थितीत नरेंद्र दाभोलकर नावाचा एक तरुण निव्वळ डॉक्टरी करत सुखाचं आयुष्य जगणं शक्यच नव्हतं. आपली सुविद्य पत्नी वृंदा यांच्या हाती हॉस्पिटलचा पसारा सोपवून निश्चयानं तेसमाजपरिवर्तनाच्या लढ्यात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून उतरले. एक गाव एक पाणवठा मोहीम ही त्यांच्या विचारांच्या अग्रक्रमांच्या कार्यपद्धतीच्या दृष्टीनं नेमकेपणा आणणारी ठरली. 

सातारा जिल्हा हा एका अर्थानं यशवंतराव चव्हाण प्रतापसिंह आणि अभयसिंहराजे भोसले अशा दिग्गजांचा जिल्हा. काँग्रेसचा बालेकिल्ला. समाजवादी युवक दलाच्या माध्यमातून कष्टकऱ्यांचे दलितांचे मजुरांचे ,भूमिहिनांचे स्त्रियांचे प्रश्न घेऊन सत्तेच्या या चिरेबंदीला भेदणं हे आव्हानाचंच काम होतं. डॉ. दाभोलकरांच्याच शब्दांत सांगायचं तर , ' शक्तिशाली निद्रिस्त सिंहाच्या अंगावर बागडणाऱ्या उंदरासारखी ही धडपड होती. मात्र हा उंदीर नंतर भलताच उपद्रवी ठरणार आहे याची जाणीव प्रस्थापितांना तेव्हापासूनच व्हावी इतका नेमकेपणा आणि आक्रमकपणा डॉक्टरांच्या मांडणीत आणि कार्यक्रमांतही होता. 

डॉ. आढावांबरोबर म. जोतिराव फुले समता प्रतिष्ठानचं आणि विषमता निर्मूलन समितीचं काम पुढं रेटताना प्रतिष्ठानशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांना आपल्या कार्याच्या पुढील दिशा स्पष्ट झाल्या. त्यात डॉक्टरांचा कल अंधश्रद्धा निर्मूलनाकडं झुकला आणि १९८३च्या सुमारास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चं काम महाराष्ट्रात सुरू झालं. 

सत्यसाईबाबांच्या चमत्कारांना आव्हान देणाऱ्या अब्राहम कोवूरांच्या चमत्कार खरे आहेत हे सिद्ध करा एक लाखाचं इनाम घेऊन जा ,' हे आवाहन त्यांनी राज्यभर तळमळीनं पोचवलं. आजतागायत हे आवाहन स्वीकारणारा माईचा लाल निघालेला नाही. पुरोगामी चळवळीच्या शिरस्त्याप्रमाणं समितीचं विभाजन झालं आणि १९८९पासून डॉक्टरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वेगळी चूल मांडली. कामाचा जोष आणि झपाटा मात्र कायम राहिला. नरबळी भानामती भूतप्रेत जादूटोणा याबरोबरीनंच आध्यात्मिक झुलीखाली झुलणारी आ​णि भक्तांना झुलवणारी बाबा आणि बापूगिरी यांचा पर्दाफाश समिती करत राहिली. या २५ वर्षांत डॉक्टरांनी तरुण उत्साही कार्यकर्त्यांची अफाट फौज जमवली. जिल्ह्याजिल्ह्यात तालुक्या-गावांत हे तरुण-तरुणी श्रद्धा ,अंधश्रद्धा भक्ती कर्मकांड यांवर आज निर्भीड विचार मांडत आहेत. चिकित्सा करत आहेत. 

हीच धर्मचिकित्सा डॉक्टरांच्या प्राणावर बेतली का निश्चित सांगणं अवघड आहे परंतु संशयाच्या सुया तिथंच वळत आहेत. ऑगस्ट २००२पासून त्यांनी अंधश्रद्धांना आवर घालणारा कायदा व्हावा या मागणीसाठी रान उठवायचं ठरवलं. कायद्याचं प्रारूप तयार करणं तांत्रिक गरजांनुसार त्यात बदल करणं आराखडा बनून विधेयकात त्याचं रूपांतर होईपर्यंत प्रबोधनाचे सर्व मार्ग चोखाळणं राजकीय पक्षप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचं मन या कायद्यासाठी अनुकूल करणं हे त्यांचं जणू मिशनच बनलं होतं. या कायद्याबद्दल अनेक गैरसमज आपापतः किंवा हेतूतः पसरले/पसरवले गेले. विशेषतः वारकरी संप्रदायात त्याला मोठा विरोध निर्माण झाला. त्यांच्याशी आणि ज्यांना ज्यांना शंका आहे त्या सर्वांशी चर्चा करण्यात डॉक्टर कधी थकले नाहीत आणि हटलेही नाहीत. विविध दबावांमुळे या विधेयकात इतके बदल झाले की त्याचे नावही अखेर जादूटोणाविरोधी कायदा असं बदललं. 

इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. दाभोलकर नामोहरम झाले नव्हते. बोलू आणि मार्ग काढू अशी त्यांची तयारी असे. धर्म परंपरा कर्मकांड यांबाबत शांतपणं पण ठामपणं ते वादंगाला कायम तयार असत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सापेक्ष कल्पना आहेत आणि त्यांच्यात फारच अस्पष्ट रेघ आहे... सबब फक्त अंधश्रद्धांचं निर्मूलन हे मृगजळ आहे असं मानणाऱ्या पुरोगाम्यांमधील जहाल गटांनी त्यांच्या भूमिकांवर बरेचदा टीका केली आहे. त्यांच्या मध्यममार्गाची खिल्लीही उडवली आहे. त्यांचे अनेक जुने सहकारी त्यांना दुरावले. या कशानेही विचलित न होता ते आपलं म्हणणं मांडत राहिले. 

मात्र अंनिस हीच त्यांची ओळख नव्हती. राष्ट्र सेवा दल असो महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक आधार देणारा सामाजिक कृतज्ञता निधी असो साताऱ्यातील रयत शिक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन या संस्था असोत परिवर्तन हे व्यसनमुक्ती केंद्र असो की गेली सात वर्षं त्यांनी यशस्वीपणं सांभाळलेली साधना साप्ताहिकाची धुरा असो डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नाव त्यांच्या इतिहासात कुठं ना कुठं सापडत राहीलच. तुकड्यातुकड्यांनी चळवळी उभारत नाहीत टिकत नाहीत त्या समग्र प्रश्नाशी जोडून घ्यायला हव्यात हा त्यांचा आग्रह असे. कायम खादी वापरणाऱ्या डॉक्टरांच्या वैयक्तिक जीवनातही या आग्रहाचे प्रति​बिंब वेगळ्या पद्धतीनं पडलेलं दिसेल... त्यांच्या मुलाचं नाव हमीद आहे हमीद दलवाईंशी असलेला डॉक्टरांचा स्नेह हे त्यांच्यातील बहुमुखी कार्यकर्त्याचंच प्रतिबिंब आहे. 

अशा या चर्चेला कायम तयार असणाऱ्या अहिंसेचं तत्त्व मनोमन मानणाऱ्या समाजातील वाईटाचं निर्मूलन होऊन सर्वसामान्यांचं जीवन सुखी व्हावं असं वाटणाऱ्या माणसाची अखेर ही महाराष्ट्रातील सुजाणांना चिंता वाटावी अशीच आहे. त्याचबरोबर एरवी गुळगुळीत वाटणारा नेमस्त पण चिवट आणि ठाम मध्यममार्ग प्रत्यक्षात हितसंबंधीयांना थ्रेट वाटत असतो हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. आपले हितसंबंध जपणारी व्यवस्था शाबूत राहावी यासाठी राजसत्ता अर्थसत्ता आणि धर्मसत्ता या तिन्ही सत्तांचा वापर करणारी माणसं नेमकी कशाला आणि कोणाला बाजूला सारू पाहतात याचं उत्तर शोधू गेलं तर या सत्ताचौकटींचंमुखवट्याआडचं अस्सल रूप ज्यांना दिसलं आणि ते इतरांच्या नजरेला आणून देण्याचा खटाटोप ज्यांनी आरंभला अशांना बाजूला सारलं. 

महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन लागलं की आश्वासनांच्याकागदपत्रांचे आणि कायद्याच्या सुधारित मसुद्याचे भारे घेऊन मंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत खेटे घालणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आता यापुढं विधानभवनाच्या आणि मंत्रालयाच्या वास्तूला दिसणार नाहीत. त्यांचे म्हणणे बुद्धीला तर पटते आहे मात्र राजकारणाच्या गाळात ते प्रत्यक्षात आणण्याची इच्छा नाही अशा धर्मसंकटातून जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची किंचित सुटका झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये इतकी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची आणि पर्यायानं डॉ. दाभोलकरांचीही परवड महाराष्ट्राने केली. मंगळवारी थंड डोक्यानं कट रचून केली गेलेली त्यांची क्रूर हत्या ही एकप्रकारे ​मनुष्यप्राण्याला माणूसपण देणाऱ्या विवेकाच्या आतल्या आवाजाचीच हत्या म्हणावी लागेल. 

डॉ. दाभोलकर यांना हा विवेकाचा आतला आवाज गेल्या चार दशकांपासूनच सतावत होता. स्वस्थ बसू देत नव्हता. दाभोलकरांच्या कुटुंबाचाच अविभाज्य भाग असलेल्या या विवेकाचा समाजवाद हा चेहरा होता आणिमार्गाची प्रेरणा म. गांधींची होती. १० भावंडांमधील सर्वात धाकटे असलेले नरेंद्र यांची प्रकृती थोरले बंधु शिक्षणतज्ज्ञ देवदत्त शेतीतज्ज्ञ बंधु श्रीपाद दुसरे बंधु दत्तप्रसाद आणि दत्तप्रसन्न यांच्यापेक्षा काहीशी बंडखोरीची आणि कठोर चिकित्सेची. साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून शालेय आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतल्यावर मिरजेच्या मेडिकल कॉलेजातून त्यांनी एम.बी.बी.एस. पूर्ण केलं. १२ वर्षं साताऱ्यातडॉक्टरकी केली. लौकिक अर्थानं पाह्यलं तर कोणाही मध्यमवर्गीयाला समाधान वाटेल असं आयुष्य आणि करिअर त्यांच्या हिश्श्याला आलं होतं. नुसती डॉक्टरकीच केली असती तरी लोकांनी नावाजलं असतंच... पैसाही मिळाला असता. 
१९७०चं दशक हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वादळ घेऊन आलं. दलित चळवळीची झंझावाती सुरुवात झाली होती. सत्यशोधक विचारधारा प्रमाण मानत समाजपरिवर्तनाचा आग्रह धरणारे नेते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेल्या एक गाव एक पाणवठा मोहिमेने महाराष्ट्रात खोलवर रुजलेल्या जातीयतेचं विद्रुप रूप समोर येत होतं. विकासाच्या गंगेचा थेंबही न पोहोचलेल्या खेड्यापाड्यातील वंचित भूमिहिनांची गाऱ्हाणी मुखर करणारीआंदोलनं रुजू पाहत होती. अशा स्थितीत नरेंद्र दाभोलकर नावाचा एक तरुण निव्वळ डॉक्टरी करत सुखाचं आयुष्य जगणं शक्यच नव्हतं. आपली सुविद्य पत्नी वृंदा यांच्या हाती हॉस्पिटलचा पसारा सोपवून निश्चयानं तेसमाजपरिवर्तनाच्या लढ्यात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून उतरले. एक गाव एक पाणवठा मोहीम ही त्यांच्या विचारांच्या अग्रक्रमांच्या कार्यपद्धतीच्या दृष्टीनं नेमकेपणा आणणारी ठरली. 

सातारा जिल्हा हा एका अर्थानं यशवंतराव चव्हाण प्रतापसिंह आणि अभयसिंहराजे भोसले अशा दिग्गजांचा जिल्हा. काँग्रेसचा बालेकिल्ला. समाजवादी युवक दलाच्या माध्यमातून कष्टकऱ्यांचे दलितांचे मजुरांचे ,भूमिहिनांचे स्त्रियांचे प्रश्न घेऊन सत्तेच्या या चिरेबंदीला भेदणं हे आव्हानाचंच काम होतं. डॉ. दाभोलकरांच्याच शब्दांत सांगायचं तर , ' शक्तिशाली निद्रिस्त सिंहाच्या अंगावर बागडणाऱ्या उंदरासारखी ही धडपड होती. मात्र हा उंदीर नंतर भलताच उपद्रवी ठरणार आहे याची जाणीव प्रस्थापितांना तेव्हापासूनच व्हावी इतका नेमकेपणा आणि आक्रमकपणा डॉक्टरांच्या मांडणीत आणि कार्यक्रमांतही होता. 

डॉ. आढावांबरोबर म. जोतिराव फुले समता प्रतिष्ठानचं आणि विषमता निर्मूलन समितीचं काम पुढं रेटताना प्रतिष्ठानशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांना आपल्या कार्याच्या पुढील दिशा स्पष्ट झाल्या. त्यात डॉक्टरांचा कल अंधश्रद्धा निर्मूलनाकडं झुकला आणि १९८३च्या सुमारास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चं काम महाराष्ट्रात सुरू झालं. 

सत्यसाईबाबांच्या चमत्कारांना आव्हान देणाऱ्या अब्राहम कोवूरांच्या चमत्कार खरे आहेत हे सिद्ध करा एक लाखाचं इनाम घेऊन जा ,' हे आवाहन त्यांनी राज्यभर तळमळीनं पोचवलं. आजतागायत हे आवाहन स्वीकारणारा माईचा लाल निघालेला नाही. पुरोगामी चळवळीच्या शिरस्त्याप्रमाणं समितीचं विभाजन झालं आणि १९८९पासून डॉक्टरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वेगळी चूल मांडली. कामाचा जोष आणि झपाटा मात्र कायम राहिला. नरबळी भानामती भूतप्रेत जादूटोणा याबरोबरीनंच आध्यात्मिक झुलीखाली झुलणारी आ​णि भक्तांना झुलवणारी बाबा आणि बापूगिरी यांचा पर्दाफाश समिती करत राहिली. या २५ वर्षांत डॉक्टरांनी तरुण उत्साही कार्यकर्त्यांची अफाट फौज जमवली. जिल्ह्याजिल्ह्यात तालुक्या-गावांत हे तरुण-तरुणी श्रद्धा ,अंधश्रद्धा भक्ती कर्मकांड यांवर आज निर्भीड विचार मांडत आहेत. चिकित्सा करत आहेत. 

हीच धर्मचिकित्सा डॉक्टरांच्या प्राणावर बेतली का निश्चित सांगणं अवघड आहे परंतु संशयाच्या सुया तिथंच वळत आहेत. ऑगस्ट २००२पासून त्यांनी अंधश्रद्धांना आवर घालणारा कायदा व्हावा या मागणीसाठी रान उठवायचं ठरवलं. कायद्याचं प्रारूप तयार करणं तांत्रिक गरजांनुसार त्यात बदल करणं आराखडा बनून विधेयकात त्याचं रूपांतर होईपर्यंत प्रबोधनाचे सर्व मार्ग चोखाळणं राजकीय पक्षप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचं मन या कायद्यासाठी अनुकूल करणं हे त्यांचं जणू मिशनच बनलं होतं. या कायद्याबद्दल अनेक गैरसमज आपापतः किंवा हेतूतः पसरले/पसरवले गेले. विशेषतः वारकरी संप्रदायात त्याला मोठा विरोध निर्माण झाला. त्यांच्याशी आणि ज्यांना ज्यांना शंका आहे त्या सर्वांशी चर्चा करण्यात डॉक्टर कधी थकले नाहीत आणि हटलेही नाहीत. विविध दबावांमुळे या विधेयकात इतके बदल झाले की त्याचे नावही अखेर जादूटोणाविरोधी कायदा असं बदललं. 

इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. दाभोलकर नामोहरम झाले नव्हते. बोलू आणि मार्ग काढू अशी त्यांची तयारी असे. धर्म परंपरा कर्मकांड यांबाबत शांतपणं पण ठामपणं ते वादंगाला कायम तयार असत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सापेक्ष कल्पना आहेत आणि त्यांच्यात फारच अस्पष्ट रेघ आहे... सबब फक्त अंधश्रद्धांचं निर्मूलन हे मृगजळ आहे असं मानणाऱ्या पुरोगाम्यांमधील जहाल गटांनी त्यांच्या भूमिकांवर बरेचदा टीका केली आहे. त्यांच्या मध्यममार्गाची खिल्लीही उडवली आहे. त्यांचे अनेक जुने सहकारी त्यांना दुरावले. या कशानेही विचलित न होता ते आपलं म्हणणं मांडत राहिले. 

मात्र अंनिस हीच त्यांची ओळख नव्हती. राष्ट्र सेवा दल असो महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक आधार देणारा सामाजिक कृतज्ञता निधी असो साताऱ्यातील रयत शिक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन या संस्था असोत परिवर्तन हे व्यसनमुक्ती केंद्र असो की गेली सात वर्षं त्यांनी यशस्वीपणं सांभाळलेली साधना साप्ताहिकाची धुरा असो डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नाव त्यांच्या इतिहासात कुठं ना कुठं सापडत राहीलच. तुकड्यातुकड्यांनी चळवळी उभारत नाहीत टिकत नाहीत त्या समग्र प्रश्नाशी जोडून घ्यायला हव्यात हा त्यांचा आग्रह असे. कायम खादी वापरणाऱ्या डॉक्टरांच्या वैयक्तिक जीवनातही या आग्रहाचे प्रति​बिंब वेगळ्या पद्धतीनं पडलेलं दिसेल... त्यांच्या मुलाचं नाव हमीद आहे हमीद दलवाईंशी असलेला डॉक्टरांचा स्नेह हे त्यांच्यातील बहुमुखी कार्यकर्त्याचंच प्रतिबिंब आहे. 

अशा या चर्चेला कायम तयार असणाऱ्या अहिंसेचं तत्त्व मनोमन मानणाऱ्या समाजातील वाईटाचं निर्मूलन होऊन सर्वसामान्यांचं जीवन सुखी व्हावं असं वाटणाऱ्या माणसाची अखेर ही महाराष्ट्रातील सुजाणांना चिंता वाटावी अशीच आहे. त्याचबरोबर एरवी गुळगुळीत वाटणारा नेमस्त पण चिवट आणि ठाम मध्यममार्ग प्रत्यक्षात हितसंबंधीयांना थ्रेट वाटत असतो हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. 

गुरुवार, २५ जुलै, २०१३

मराठी बाना - अतुल कुलकर्णीला दक्षिणेतला फिल्मफेअर

'नटरंग', 'वळू', 'चांदनी बार', 'हे राम' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणा-या अतुल कुलकर्णी याला दक्षिणेतल्या मानाच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 'इडिग्रीके' (धैर्य) या कानडी चित्रपटातील भूमिकेसाठी अतुलला सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

काल (शनिवार) संध्याकाळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत हैदराबाद येथील इंटरनॅशनल कॉनव्हकेशन सेंटरमध्ये ६० वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कानडी, तेलगू, तामीळ, मल्याळम सिनेमातील कलाकारांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. अतुलला सुमिर किट्टीर दिग्दर्शित आणि अग्नि श्रीधर यांच्या 'इडिग्रीके' (Edegarike) या कादंबरीवर आधारीत सिनेमातील अभिनयासाठी पुरस्कार देण्यात आला. 'इडिग्रीके' सिनेमामध्ये अतुलने खून्याची भूमिका साकारली आहे.

मंगळवार, २३ जुलै, २०१३

मराठी डॉक्टर

लंडन- ब्रिटिश युवराज्ञी केटचे बाळंतपण करणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकात मराठी डॉक्टरचाही समावेश होता. लंडनच्या सेंट मेरी रुग्णालयातील डॉ. सुनीत विनोद गोडांबे असे या मराठमोळ्या डॉक्टरचे नाव आहे. दरम्यान, नवजात प्रिन्सला पाहण्यासाठी जगभरातील लाखो लोक आतुर आहेत. एवढेच नव्हे, बाळाचे नाव काय असेल यावरही सट्टा लावला जात आहे.
ब्रिटिश राजघराण्यातील पाहुण्याबद्दल जगभरात उत्सुकता होती. केम्ब्रिजची राजकुमारी केटच्या बाळंतपणासाठी महाराणी एलिझाबेथ (द्वितीय)चे माजी प्रसूतितज्ज्ञ मार्कस सेशेल यांच्या नेतृत्वाखाली सेंट मेरी रुग्णालयातील तज्ज्ञांचे खास पथक तयार होते. यात नवजात अर्भक तज्ज्ञ डॉ. गोडांबे यांच्यासह गाय थोर्प, अ‍ॅलन फार्दिंग यांचा समावेश होता.     
2013 चांदीची नाणी
शाही बाळासोबत याच दिवशी जन्मलेल्या 2013 बाळांना शाही घराण्याच्या वतीने भेट म्हणून चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. यासाठी पालकांना facebook.com/theroyalmint या वेबसाइटला भेट देऊन आपल्या बाळाच्या जन्मतारखेची जन्माच्या अधिकृत दाखल्यासह नोंदणी करावी लागेल. यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. एका नाण्याची किंमत 28 पाउंड आहे.

मंगळवार, १८ जून, २०१३

मराठी माणूस विकतोय लंडनमध्ये वडापाव


परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना भारतीय पदार्थ मिळण्याची नेहमीच वानवा असते आणि झटकेपट पोट भरणारा गरमागरम वडा पाव म्हंटलं की, त्यांना मुंबईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण अशा खवय्यांसाठी एक खास खबर... याच वडा पावची चव आता अगदी सातसमुद्रापार साहेबांच्या देशात, लंडनमध्येही चाखता येणार आहे आणि तेही आपल्या खास मराठमोळ्या हॉटेलमध्ये.

'श्रीकृष्ण वडा पाव' या नावानेच लंडनमध्ये हॉटेल सुरू करण्यात आलं आहे आणि तेही एका मराठी माणसाने हे हॉटेल सुरू केल्याने त्याला खास 'मराठी तडका' असणार हे मात्र निश्चित. सुबोध जोशी आणि सुजय सोहनी यांनी १५ ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे हॉटेल सुरू केलं. २०१० मध्ये एक छोटसं स्नॅक्स बार त्यांनी सुरु केलं होतं. पण अल्पावधीतच भारतीय खवय्यांनी या स्नॅक्स बारला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. भारतीयांचा मिळालेल्या ह्या पाठिंब्याचा जोरावर त्यांनी रेस्टॉरंट देखील उभारलं आणि आता तर लंडनमधील हॅरो शहरातही दुसरं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. 'मराठीमोळी टीम' असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये तुम्हांला अस्सल मराठी पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे आणि त्यात सगळ्यात खास पदार्थ म्हणजे वडा पाव. या रेस्टॉरंटमध्ये फक्त एक युरो मध्ये तुम्हांला वडा पावचा आस्वाद घेता येईल. पण फक्त वडा पावच नव्हे तर बटर वडा पाव, शेजवान वडा पाव अशा वेगवेगळ्या चवीतही वडा पाव उपलब्ध आहे. वडा पावसोबतच अनेक भारतीय पदार्थ येथे तुम्हांला मिळू शकतात. मेनू कार्डवर नजर टाकल्यास तुम्हाला दिसूनही येईल की, परदेशी पदार्थांना येथे कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही.

पुरणपोळी सारख्या अस्सल मराठी पदार्थासोबतच इतर भारतीय पदार्थही तुम्हांला मिळणार आहे. म्हणजे पंजाबी, साऊथ इंडियन, गुजराती अशा पदार्थांची अक्षरश: रेलचेल आहे. खास चाट म्हणजे झणझणीत तिखट अशी पाणीपुरी देखील मिळेल. या रेस्टोरंटमुळे लंडनमधील खवय्यांची भारतीय पदार्थ चाखण्याची गैरसोय दूर झाली आहेच पण परदेशी खवय्येही ही या रेस्टॉरंटकडे वळतील असा विश्वास अनिवासी भारतीयांना बोलून दाखवला आहे.